Saturday, March 12, 2011

मी चार चौघात असतानाही एकटाच असतो, 
सर्व दिवे विझल्यावर मी एकटाच जळतो.
वेळ वाढत जाते जशी तुझ्या दुराव्याची,
मी अधिकच बेचैन होतो,
कालोखातील काजव्याच्या प्रकाशात,
मी दूर एकटाच चालत जातो.
वाट संपत येते तरी पाय चालत राहतात,
अन वाट संपल्यावरही त्या वाटे वर नयन तुझी वाट पाहतात.