Wednesday, April 4, 2012

तू असल्यावर दुसर काही आठवत नाही,
रिकाम्या वाटेवरून जातानाही, ती सुनी वाटत नाही.
तुझी आठवण न घेवून येणारा,
दिवस कधी येवूच नाही.
हृदयात तुझ्या मीच आहे, 
आता मला बाहेर कुठे फिरावेसे वाटत नाही.

कधी इतक प्रेम मी केल,
मलाच ठावूक नाही.
भावनांच्या सागराला मी आता,
कुठलेच मी बंध ठेवले नाही.

प्रेम असलं कि काही सुचत नाही,
एकांतात अचानक हसू येई,
रात्र रात्र जागून,
मन उगाचच स्वप्न पाही.


प्रेम म्हणजे तुझा ध्यास,
नसलेल्या तुझ्या सहवासाचा उगाच अट्टहास.
प्रेम म्हणजे माझे स्वप्न, 
तुझ्या आठवणीतले क्षण हृदयात जपण.