Saturday, April 6, 2013

भाव मनीचा न कळला तुला कधी,
समजून सारे तू अलिप्त कशी,
सांगतात नयन तुझेही,
कि तुलाही आहे प्रीत माझी.

विसरून जगाला मी तुझाच झालो,
आठ्वाच्या सागरात मी न्हावून आलो.



तुझ्यासाठी  मी काहीही असेन, पण माझ्यासाठी  तू ती आहेस,
जिच्या असण्याने माझे हृद्य धडधडते.








कुणासाठी काहीतरी करताना,  मी काहीतरी हरवलं.
आपल्याच हृदयातील भावनांना मी  पुन्हा एकदा रडवलं.







अस म्हणतात कि कुणी आठवण काढत असेल तर तर उचकी लागते,
हे जर खरच सत्य असेल तर मला माफ कर,
 माझ्या मुळे तुला खूपच त्रास होत असणार,
कारण माझा प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीतच जातो.