परंतु तुझ्या आठवणी मनातून माझ्या कश्या निघतील.
सांग न तू तुला विसरू कसा,
आसवांच्या बांधला आडवू कसा.
तुला पाहताना डोळ्याची पापणी जरा हि लावली नाही,
तुझे हास्य असेच राहू दे,
कारण माझ्या मनातील व्याकुळता अजून शमली नाही.
फुलांच्या गंधात गंध तुझाच येतो,
तुझ्या स्थित प्रीतीला माझ्या बहार येतो.
शपत घेवून सांगतो आठवण तुझी खूप येते.
तू परत भेटणार नाही या वेदनेने, मन माझे आणखी व्याकुळ होते.
वाळलेली पर्णे आज सरकन उडून जात आहे,
दूर झाल्यावर तू, आठवण तुझी खूपच येत आहे.
घेताना श्वास फक्त एकदा मला आठव,
त्या श्वासाबरोबर मी तुझ्या हृदयात जाईल.
सोडताना श्वास मात्र मला विसर,
तरच मला सदैव तुझ्या हृदयात राहता येईल.