त्या तुझ्या आठवणीना मनातून पुसायचे आहे.
नको तो ध्यास तुझा, नको ती तळमळ,
नको पुन्हा नयनाखाली अश्रूंचा सागर.
रणरणत्या उन्हातून आता मला सावलीत चालायचं आहे,
तुला दिलेल्या घावांवर्ती जरा मलम मला लावायचं आहे.
वाट पाहण्यात तुझी उभ्या पायांना माझ्या जरा बसवायचं आहे,
वाट पाहून थकलेल्या त्या नयनांना जरास का होईना मिटवायच आहे.
धडधडनार्या स्पन्दनाना हळू जरा करायचं आहे,
त्रासलेल्या हृदयाला आज मला शांत करायचं आहे.
प्रितीतील घाव हे न बुजनारे आहे,
परंतु त्या जख्मानाच आता मला विसरायचे आहे.
जा तू खरच जा दूर माझ्या पासून,
आता मला तुझ्या विना ह्या जगात एकटाच जगायचं आहे.
कारण उरलेल्या त्या काही स्मृतींना तुझ्या मला अजरामर करायचं आहे.