Wednesday, August 17, 2011

आपण जीवनात कधी ना कधी घेतलेला अनुभव आणि त्याच्या त्या आठवणी सदैव स्मरणात राहतात, जसे कि, उन्हाळ्यानंतर आणि पावसाच्या आधी खूप गरम होत असते जीव नको नकोसा होऊन जातो आणि एके  दिवशी अचानक बाहेर असताना पावूस सुरु होतो, सगळीकडे तापलेल्या त्या धरणीचा सुगंध दरवळतो आणि सोबतच आपल्या शरीरावरहि त्या गार-गार थेंबांची बरसात होत असते ...कसा सुंदर अनुभव असतो ना. तसाच थंडीच्या दिवसात पहाटे फिरायला कधी गेला आहात ...जर गेला असाल तर आपणास माहीतच असेल वरती सगळीकडे धुके आणि पायाखाली हिरवे गार गवत आणि त्यावर साठलेले  दवबिंदू ....त्यांचा तो पायाला होणारा स्पर्श ....कसे मोहरून टाकणारा अनुभव असतो ना ....अश्याच अनेक अनुभवातून जीवनातील सुंदर सुंदर घटना क्रम आणि त्याच्या सुंदर आठवणी बनत जातात.....तसाच अनुभव आपणास प्रेमातही येतो...हे सर्व अनुभव आपल्याला पुस्तकात किवा गूगल वर सापडत नाही हे स्वतःच अनुभवावे लागतात...so go for it...