पाऊस सुरु झाला कि मन पावसात भिजण्यासाठी आतुर होते, पण आजारीपडण्याची भीती आणि लोक काय म्हणतील ह्या लाजेने बर्याच वेळेस आपण त्या सुंदर अनुभवापासून दूर राहू पाहतो पण आपले मन आपल्याला त्या पावसात ओढतच नेते ना. तसे काही प्रेमाचे आहे, प्रेमात कितीही यातना झाल्या, कितीही दुख वाट्याला आले, कितीत हि अश्रुनी बलिदान दिले तरी आपण प्रेम करतोच.....प्रेम हि भावनाच अशी असते.