Thursday, July 28, 2011

ते दोघे..

ते दोघे कॉलेज च्या पहिल्या वर्ष्यापासून सोबत होते. आता ते मास्टर्स ला आले आणि पाहता पाहता ते हि संपले.
 ती नौकरी करू लागली आणि तो हि नौकरीच्या शोधात होता. एक दिवशी तो तिच्या शहरात गेला आणि तिला फोन केला. तिने हि त्याचा नंबर पाहताच लगेच फोने उचलला. तो म्हणाला मला तुला भेटायचे आहे. तिने वेळ न दवडता लगेच होकार दिला. वेळ ठरली आणि मनात अनेक विचाराचे काहूर उठले. का आज का? कशासाठी? संध्याकाळची वेळ होती दोघेही शहराबाहेरील एका निवांत ठिकाणी भेटले. दोघेही निस्तब्ध पण डोळ्यात दोघांच्याहि अनेक भाव. असाच अर्धा तास गेला दोघेही अजून हि निशब्द होते. मग तिनेच धीर करून विचारले, काय झाल नौकरीचे ? आणि तो हि मग भानावर आला. तो म्हनाला मला परदेशात नौकरीची ऑफर आलि आहे आणि मी २ दिवसात परदेशी जाणार आहे. जाण्या अगोदर तुला भेटण्याची इच्छा होती. तिचा चेहरा लगेच सुकून गेला. तो बोलला अग जाण्या अगोदर मला तुला काही विचारायचे आहे विचारू का? ती म्हणली विचार न परवानगी कशाला मागतो. तो तिच्या डोळ्यात पाहून एक दीर्घ श्वास घेत बोलला मला तू कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडतेस पण मी तुला सांगू शकलो नाही आज हे सांगतो आहे कारण मला माहित नाही कि परत आपली भेट कधी होईल? माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू सांग तुझे हि आहे का? ती शांत झाली आणि थोड्याच वेळात त्याच्या छातीवर डोके ठेवून बोलली दुसरे कोणी आहे का तुझ्या शिवाय ह्या जगात, सांग ना. किती उशीर केलास रे? आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. त्याने तिला सावरले आणि आपल्या बाहूत घट धरून ठेवले तिच्या नयनातून पडणार प्रत्येक थेंब त्याला वेदना देत होता आणि तीचा विरह सहन करावा लागणार म्हणून आता तो हि रडत होता.......

म्हणूनच जर प्रेम केल तर सांगून टाका....be brave if u can love some one then surely u can express it...