Wednesday, September 21, 2011

आज भेट नाही न झाली काल,
गेले दिवस जसे मी नाही या जगात.
कुणी तरी येत दिलासा देवून जात, 
त्यांना काय माहित शरीराला नको कुठलाच आधार.
आता नीर डोळ्यातील सुकून जातील,
पण उमटलेल्या रेखा गालावरील तश्याच राहतील.

जगतो मी आता आठवणीच्या सहारयावर,
रोज तुझी मनाला ह्या नवी ओढ.
सावरतो जेव्हा मी ढासळते मन,
मन सावरताना ढळतो आसवांचा बांध.

जरा तू दूर जरा मी दूर,
आहेत तरी बंध आपले प्रीतीचे अतूट,
नाही वेगळी तू माझ्या हृदयातून,
तरी का ते तुझ्यासाठीच आतुर.