उद्या ती येणार नाही का पाहशी तू वाट.
साचले पाणी अंगणात आणि थोडे या नयनात,
ती नाही तुझसाठी मग का तू असा अधीर मिलनास.
मी बसलो जेव्हा जेव्हा वाट पाहत तुझी,
नाही येणे जमले तुला तू अशी कशी?
मन उदास होऊन गेले सदा सांजवेळी,
मावला तो रवी पण न मावळली वेडी आशा माझी.
भिजण्यासाठी मी हि मग आतुर होऊन जातो.
विचारांचे वारे मनाला स्पर्श करून जातात,
तुझ्या स्मृतीचा गंध मागे ठेवून जातात.
मला आवडत तुझ्या विचारात रात्र रात्र जागायला,
तुझ्या सोबतच्या त्या क्षणांना हृदयात जपायला.
आज तुझ्यासाठी लिहीहायला शब्द कमी पडतात,
तुझ्यासाठीच ते आता माझ्या कडे हट्ट करतात.