काही तरी लिहावे म्हणतो मी,
पण विचार सारे थकले.
तुझाच चेहरा पाहून,
हे लिहिण्याचे धाडस करतो.
चांगले असेल कि माहित नाही,
पण दोन शब्द पुन्हा तुझ्यासाठीच लिहितो.
वेळ कसा पटकन निघून जातो ना?
तू आणि तुझे संवाद हरवून किती क्षण गेले.
रोझच तुझा चेहरा आठवतो मी,
अन तूला कसकाय हरवली, म्हणून स्वतावर रागावतो मी.
किती नाजूक होते ते काही क्षण,
जे जपत आलो आहे मी.
तू मात्र विसरलीस,
ज्या काही माझ्या आठवणी तुला दिल्या होत्या मी.
किती सहज विसरतात काही लोक, आपल्याच हृदयातील भावनांना,
काहीच नाही वाटत का त्यांना त्या अश्या उध्वस्त करताना.