Saturday, April 16, 2011

आज निरोप घेताना.....

आज निरोप घेताना एक उत्साह,
मन मात्र  उदास आहे.
ज्या काही आठवणी आहे मित्रानो तुमच्या,
त्याच आता माझ्या बरोबर आहे.
घराची ओढ कधी संपली नाही,
पण तुम्ही घरापासून मी दूर हे जाणवू दिले नाही.
आपल्यातील तो स्नेह, भांडणे आणि ती मस्करी,
आणि न विसरता येणारी ती आपली यारी.
दर शनिवारी ती रंगलेली आपली मेहफिल,
आणि आणि शेजार्यांनी येवून केलेली ती किरकिर.
त्यातहि होती एक नवीनच मज्जा,
आणि परदेशात हि होती आपली एक अशी अदा.
रोजचा तो आपला नवीन उपद्याव्प,
आणि आपलाच सगळीकडे राज.
दर रविवारचे मंदिरातील जेवण,
आणि जेवानंतरचे ते झोपेचे काही क्षण.
खूप काही आठवणी आणि खूप काही गोष्टी,
नाही विसरता येणारे आपल्या मैतीचे ते रेशंम बंध.
धन्यवाद मित्रानो तुमच्या प्रेमासाठी, 
नक्कीच भेटू पुन्हा कुठल्यातरी वळणावरी !!!!!!