Wednesday, August 15, 2012

सरगम थेंबांची जरा ऐकून जा,
उतावीळ मनाला शांत करून जा.

मी माझ अस्तित्व हरवून बसलो आहे,
तुझ्या साठीच मी अजून झुरलो आहे.
नसतेस तू जेव्हा,
मी एकटाच या पावसात भिजलो आहे.

माझ्या उदास पनातही तू साथ देत होतास,
माझ्या आनंदातही तूच होतास,
मग असे आज काय झाले तू दाटून तर आलास,
मात्र अश्रूनि माझे नयन बरसून गेले.