Wednesday, April 4, 2012

तू असल्यावर दुसर काही आठवत नाही,
रिकाम्या वाटेवरून जातानाही, ती सुनी वाटत नाही.
तुझी आठवण न घेवून येणारा,
दिवस कधी येवूच नाही.
हृदयात तुझ्या मीच आहे, 
आता मला बाहेर कुठे फिरावेसे वाटत नाही.

कधी इतक प्रेम मी केल,
मलाच ठावूक नाही.
भावनांच्या सागराला मी आता,
कुठलेच मी बंध ठेवले नाही.